करमाळा शहरातील रस्ते दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे असून, गेली दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी न मिळाल्यामुळे, सर्व प्रलंबित कामे असून यासाठी 18 कोटी रुपयाची मागणी नगरपालिकेने केली होती. याचा पाठपुरावा करून नगराध्यक्ष वैभव जयवंतराव जगताप यांनी याबाबत मंत्रालयात उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी "जयवंत भाऊ का आले नाही?" असा प्रश्न विचारून, तात्काळ या निवेदनावर कारवाई करण्याचे लेखी आदेश देऊन नगर विकास 22 चे सचिव सहस्त्रबुद्धे यांना भ्रमणध्वनी वरून, फोन करून तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मंत्रालयात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, वैभवराजे जगताप, प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब बलदोटा यांनी आरोग्यमंत्री आबिटकर, उद्योगमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या गाठीभेटी घेऊन शहर व तालुक्यातील विविध मागण्यांची निवेदन दिली.
करमाळा शहर तालुक्यातील सर्व निवडणुका धनुष्यबाणावर लढवणार असून, सदरच्या निवडणूकीत घवघवीत यश मिळवू, असा मी शब्द आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला असून, तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेना मजबूत करण्यासाठी, मी व माझे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर वैभवराजे जगताप यांनी पत्रकारांना दिली.






Post a Comment