Header Ads Widget

 


करमाळा-
           करमाळा शहरासाठी उजनी जलाशयातून पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव पंप हाऊस येथे, २४० अश्वशक्तीचे दोन विद्युत पंप खरेदीसाठी नगरपरिषद प्रशासनाने निधीची मागणी केल्यानंतर, आ. संजयमामा शिंदे यांनी अवघ्या महिनाभरातच शासनाकडून १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे आता करमाळेकरांसमोरील कृत्रिम पाणीटंचाईचे संकट लवकरच संपुष्टात येणार आहे. 
        १९९३ साली दहिगाव येथून कार्यान्वित झालेल्या या योजनेसाठी, २४० अश्वशक्तीचे दोन व २०० अश्वशक्तीचा एक असे तीन पंप बसवण्यात आलेले असून, हे पंप जुने झाल्याने बिघाड, दुरुस्ती या कारणामुळे शहराचा पाणीपुरवठा, उजनी तुडुंब असताना देखील वारंवार विस्कळीत होत असल्याने, निर्माण होणाऱ्या कृत्रिम पाणीटंचाईमुळे शहरवासिय हैराण झालेले होते. आता आ. शिंदे यांच्या माध्यमातून पंप खरेदी करण्यासाठी तातडीने निधी मंजूर झाल्याने, नवीन पंप बसविल्यानंतर शहरासमोरील पाणीसंकट कायमस्वरूपी दूर होणार असल्याने शहरवासिय आणि विशेषतः महिला वर्गाकडून आ. संजयमामा शिंदे यांना धन्यवाद देण्यात येत आहेत. 

             गेल्या अनेक वर्षांपासून या कृत्रिम पाणीटंचाईमुळे शहरवासिय त्रस्त झालेले होते. मात्र याविषयी आधीचे लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन हे पूर्णतः बेफिकीर व निष्क्रिय होते. परंतु आता प्रशासनाच्या मागणीनंतर आ. संजयमामांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे, ही कृत्रिम पाणीटंचाई संपणार आहे.या कार्यतत्परतेबद्दल महिलावर्गाकडून मामांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

प्रियांका गायकवाड, अध्यक्षा- शिवसेना तालुका महिला आघाडी



Post a Comment