करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना, सरसकट पेन्शन योजना लागू करावी यासाठी प्रयत्न करत आहे लढत आहे. परंतु आजपर्यंतच्या लढ्यात फक्त आणि फक्त आश्वासने मिळाली आहेत. आणि त्यामुळेच येत्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना महाराष्ट्रात सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन सुरू करावी. या एकमेव मागणीसाठी सर्व जिल्हा परिषदेवर पेन्शन मोर्चाचे आयोजन करत आहे. त्या अनुषंगाने रविवार दिनांक 28 जुलै रोजी सोलापूर जिल्हा परिषदेवर पेंशन आक्रोश मोर्चा चे आयोजन केले आहे. याचा उद्देश फक्त एवढाच आहे की, शासनाने आता हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शनची मागणी करत आहेत. परंतु शासनाने या ना त्या प्रकारे फक्त आश्वासने दिली आहेत प्रत्यक्षात मात्र काहीही मिळाले नाही. आणि त्याचाच परिणाम म्हणून लाखोंच्या संख्येने कर्मचारी आंदोलने करीत आहेत. तेव्हा या विषयाला आता शासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आणि राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याची गरज आहे तेव्हाच हे वादळ थांबेल. रविवार दिनांक 28 जुलै रोजी सोलापूर येथे होणाऱ्या पेन्शन आक्रोश मोर्चा मध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा नेते तात्यासाहेब जाधव यांनी केले आहे.





Post a Comment