Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
                 रविवारचा दिवस ढोकरी, भिवरवाडी, बिटरगाव, वांगी 1,2,3,4 या परिसरात चैतन्यमय वातावरणाने भरून गेला होता. चारचाकी, दुचाकी वाहनांची वर्दळ ढोकरी येथील बंडगर वस्तीकडे कूच करताना दिसत होती. तर उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील शहा गावाकडून बंडगर वस्ती कडे सौरऊर्जेवरील बोट लोकांनी भरगच्च भरून येत होती. निमित्त होते शेतकरी मेळाव्याचे......भिमा खोऱ्यातील गुणवंतांच्या सन्मानाचा व उजनी काठचे प्रा. शिवाजीराव बंडगर यांच्या सेवा गौरव सोहळ्याचे. या गौरव सोहळ्यासाठी विधानपरिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील सौरऊर्जेवर चालत असलेल्या अनोख्या, अत्याधुनिक अशा बोटीतून जल सफरीचा आनंद घेत कार्यक्रम स्थळी पोहोचले. मागील आठवड्यात संपन्न झालेल्या मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत निवडून येवून, चौथ्यांदा विधानपरिषदेत पोहोचलेले आमदार विक्रम काळे, लातूरहून प्रा. शिवाजीराव बंडगर यांच्या गौरव सोहळ्यासाठी ढोकरी येथे आले होते. सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व रत्नप्रभा देवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. शेतकरी मेळाव्याचे प्रास्ताविक केळी उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले. तर अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक एच. बी. डांगे हे होते. रसायनशास्त्रातील पीएचडी धारक अरणचे डॉक्टर अमोल पाटील यांनी विकसित केलेले, सुवर्ण ऊस उत्पादन वाढ तंत्रज्ञान एकरी ९९९९/-- रुपये खर्चामध्ये 100 मे. टन ऊस उत्पादन कसे काढता येते? याविषयी विस्तृत आणि सखोल मार्गदर्शन केले. तसेच जमिनीचे, मातीचे आरोग्य राखण्यासाठी पीएच, सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय तसेच रासायनिक खत व पाणी यांचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. व त्याविषयीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

                  यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार विक्रम काळे म्हणाले कि, प्रा. शिवाजीराव बंडगर हे माझ्या समवेत गेल्या चार-पाच वर्षांपासून व्यवसाय शिक्षण विभागातील विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रश्न घेऊन लढत आहेत. त्यांची विद्यार्थी व शिक्षक यांच्या बद्दलची तळमळ, धडपड मी जवळून पाहिली. मंत्र्यासोबतच्या अनेक बैठकांमधे अभ्यासू पद्धतीने आपले मुद्दे ते पटवून देतात. जेणे करून शासन त्याकडे गांभीर्याने पाहते. अन सकारात्मक निर्णय घेते. काही समित्यांवर ही आम्ही एकत्रित काम केले. त्यांच्या या चळवळ्या स्वभावाने प्रभावीत होऊन मी त्यांच्या सेवा गौरव सोहळ्यासाठी उपस्थित राहिलो आहे. यावेळी उपस्थित आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले कि, आजच्या दिमाखदार अशा कृतज्ञता सोहळ्याने  मी प्रभावीत  झालो असून, असा कार्यक्रम आजपर्यंत मी पाहिलेला नाही. प्रा. बंडगर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यानी बंडगरांच्या सामाजिक व राजकीय  क्षेत्रातील योगदानाचा आवर्जून उल्लेख  केला. उजनी धरणग्रस्तांच्यासाठी बंडगर यांनी केलेला संघर्ष अप्रतिम असून विद्यापीठ नामांतर, पाच टीएमसी पाणी वाचवण्याच्या साठी केलेल्या यशस्वी आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी बंडगर सरांना शुभेच्छा  दिल्या. 

           यावेळी  भिमाखोऱ्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय  काम करणाऱ्या 14 गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सौरऊर्जेवर बोट निर्माण करणारे श्रीहरी जाधव, मंगेश जाधव यांच्यासह केळी उत्पादक संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झालेल्या महेंद्र पाटील, सोमनाथ खराडे, जनार्दन साळुंके, सोनाली शेटे, ललिता रकटे, शैलेश भोसले, सम्रता माने, सुनंदा रोकडे, भगत, हनुमंत यादव, विकास वाघमोडे, संकेत पवार, ईश्वरी निंबाळकर, हिंदवी जगताप, प्रशांत देशमुख, आदींचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत ढोकरीचे सरपंच देवा पाटील, दत्ता खरात, वांगी विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन भैरवनाथ बंडगर, महादेव बंडगर, शिवाजी खरात, शुभम् बंडगर, बाबासाहेब चौगुले, अर्जुन तकिक आदिनी केले. यावेळी मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, गणेश करे-पाटील, अॅड बाबुराव हिरडे यांनी त्यांची मनोगते व्यक्त केली. यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने सौरऊर्जेवर बोट सुरू केलेल्या श्रीहरी जाधव व मंगेश जाधव यांना रोख 21000 चे पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. तर बाकी गुणवंतांचा सन्मानचिन्ह व मानपत्र देवून सन्मान केला. यावेळी प्रा. शिवाजीराव बंडगर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी केले. तर आभार शहाजीराव देशमुख यानी मानले.

            कार्यक्रमास हभप रामभाऊ महाराज निंबाळकर, निखील महाराज निंबाळकर, जि. प. चे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, बाजार समितीचे उप सभापती चिंतामणी जगताप, माजी जि. प. सदस्य भानुदास पाटील, मकाईचे संचालक संतोष देशमुख, रामभाऊ हाके, गोरख जगदाळे, बापूराव कदम, उदयसिंह मोरे पाटील, खंडाळा पंचायत समिती सभापती वंदना धायगुडे पाटील, अमरजित साळुंके, डाॅक्टर अमोल घाडगे, भिमा आबा घाडगे, बाजार समितीचे संचालक देवा ढेरे, शशिकांत केकान, रंगनाथ शिंदे, बापूराव रणसिंग, वालचंद रोडगे, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक नानासाहेब लोकरे, संचालक पांडुरंग जाधव ,संचालक भागवत पाटील, माजी संचालक भारत साळुंखे. वांगी नं.1 चे सरपंच संतोष देशमुख, वांगी नंबर 3 चे सरपंच मयुर रोकडे, वांगी नं.4-- भिवरवाडी चे सरपंच रामभाऊ सूळ, उपसरपंच डॉक्टर भाऊसाहेब शेळके, सदस्य धनसिंग जयसिंगराव शेटे, वांगी नंबर 2 चे सरपंच संतोष चौधरी, उपसरपंच बशीर पटेल ,बिटरगाव चे सरपंच कुलदीप पाटील, पांगरेचे उपसरपंच विवेक पाटील, सचिन पिसाळ, माजी सरपंच चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ हराळे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन तकीक, देविदास तळेकर, वांगीच्या माजी सरपंच सौ. स्वातीताई शेळके, एलआयसी विमा एजंट विठ्ठल शेळके, माजी पंचायत समिती सदस्य सुहास रोकडे, सोमनाथ रोकडे, माळशिरस चे उपनगराध्यक्ष डाॅ. मारुती पाटील, माढा विधानसभा शिवसेना प्रमुख रामभाऊ टकले, दत्ता देशमुख, सुधीर देशमुख, तानाजी देशमुख, वांगी सोसायटी चे चेअरमन डाॅक्टर विजय रोकडे,  संचालक नितीन देशमुख, विकास पाटील, अप्पासाहेब भोसले, नागनाथ मंगवडे, कृष्णा जाधव, नामदेव महाडिक, कांतीलाल महाडिक, युवा नेते युवराज रोकडे, माजी सरपंच संजय कदम, माजी सभापती लक्ष्मण महाडीक, नितीन तकीक, विशाल तकीक, दत्तू सरडे, अण्णा सरडे, जयसिंग शेटे, यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment