आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या एक ते पंचवीस किलोमीटर अंतरावर एक लाख मॅट्रिक टन ऊस असून, या ऊस वाहतुकीसाठी प्रति टन 25 किलोमीटर अंतराच्या दराने वाहतूक दिली. तर जवळपास एक लाख मेट्रिक टनाचे ऊस गाळप आदिनाथ चे अजून होऊ शकते. मात्र जाणीवपूर्वक आदिनाथ कारखाना अडचणीत आणायचा!!! ही भूमिका अजूनही संचालक मंडळ सोडत नसून, संचालक मंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे आदिनाथ पुन्हा नुकसानीत जाईल का? अशी भीती निर्माण झाली आहे. असा आरोप बचाव समितीचे निमंत्रक हरिदास डांगे व अध्यक्ष महेश चिवटे यांनी केला आहे. गेल्या दहा दिवसात साखर हमालीचे टेंडर देण्यात संचालक मंडळात वाद झाल्यामुळे, साखर जाम झाल्यामुळे गाळप कमी झाले. एकंदरीत संचालक मंडळ बचाव समितीला विश्वासात न घेता अजून ही राजकीय स्वार्थासाठी चुकीचे निर्णय घेऊन, आदिनाथ अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. वारंवार सूचना देऊन सुद्धा संचालक मंडळ बचाव समितीच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत आहे.संचालक मंडळाच्या बैठकीला आदिनाथ बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलवले जात नाही.
आज आदिनाथ कारखान्याच्या कंपाऊंड शेजारचा ऊस बाहेरचे कारखाने घेऊन जात आहेत. केवळ वाहतुकीचे दर निश्चित न केल्यामुळे दुसऱ्या कारखान्याला ऊस जात आहे. एक ते 25 किलोमीटर अंतराच्या दरम्यानच्या सर्व ऊसाला 25 किलोमीटर प्रमाणे वाहतूक दिली. तर दररोज कारखाना 3500 मॅट्रिक टन उसाचे गाळप करेल. याच पद्धतीने माळीनगर म्हैसगाव, कमलाई या कारखान्याने धोरण करून, उसाचे गाळप वाढवले आहे. आजूबाजूचे कारखाने आदिनाथला अडचणीत आणण्यासाठी याच परिसरात जास्त वाहने टाकत आहेत. याची जाणीव संचालक मंडळाला असताना सुद्धा, संचालक मंडळ डोळ्यावर पट्टी बांधून काम करीत आहे. यामुळे विद्यमान संचालक मंडळाला आदिनाथ कारखाना चालवायचा आहे का? अजून बंद पाडायचा आहे? याबद्दल शंका निर्माण होत आहे. अशी शंका बचाव समितीने व्यक्त केली आहे. यासंदर्भात बचाव समितीच्या वतीने संपूर्ण आदिनाथच्या कामकाजाची सुध्दा पाहणी करण्यात आली. यावेळी रसायन तज्ञ खाडे, मॅनेजर आटोळे व उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी कारखान्याची माहिती दिली.




Post a Comment