Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
                महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल विशेषता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढुन सर्व शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे संपुर्ण राज्यात बंद ठेवण्यात आला होता, मोर्चे काढण्यात आले होते, हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने राज्यपाल हटाव साठी आवाज उठविला होता. परंतु राज्यपालाच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी व शिंदे गट असल्यामुळे, विरोधी गटाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसुन येत आहे. महाराष्ट्राचा अभिमान तसेच रयतेचे राजे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवछत्रपतींचा अवमान राज्यपाल करतात. त्यांचा अवमान म्हणजे संपूर्ण रयतेतील जनतेचा हा अवमान आहे.

              तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी होणाऱ्या 25 डिसेंबर रोजी, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा संपूर्ण राज्यातील जनता आपणास कधी ही माफ करणार नाही. आमचे तुमच्या भूमिकेकडे लक्ष लागुन राहिलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री याविषयी त्यांची योग्य ती भुमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा करमाळा तालुक्यातील सर्व शिवप्रेमी जनतेतुन व्यक्त केली जात आहे.


Post a Comment