करमाळा- भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश बॉडीवर असलेल्या रिदा रशिद या महिलेने, राज्याचे माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. एका गर्दीत रिदा रशिद यांना आव्हाडांनी हाताने बाजुला जा गर्दीत कशाला आलात असे म्हणत बाजुला केले. पण त्याच वेळी आव्हाडांनी आपला विनयभंग केला असा आरोप भाजपच्या कार्यकर्ती असलेल्या रिदा रशिद यांनी केलेला. सदर विनयभंगाचा गुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर आव्हाडांवर दाखल झाला असल्याने याला राजकीय वास व फुस आहे हे ऊघडपणे समजुन येत आहे. आगामी काळात ठाणे महापालिकेत जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणविस यांना जड जाणार, हे ओळखुनच ही अडकविण्याची एक बेकायदेशीर राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे.
जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे फायरब्रँण्ड नेते असुन, "हरहर महादेव चित्रपट" व "वेडात वीर दौडले सात" या दोन्ही चित्रपटात इतिहासाची जी तोडफोड केली. त्यावर देखील त्यांनी आक्षेप घेतले आहेत. इतिहासाच्या मुद्यावर ते नेहमीच आग्रेसर राहिलेत. काल परवा देवेंद्र फडणवीस ठाण्यात आले असता ऊरकता दौरा घेतला. ठाण्यातील शिंदे सेना व भाजपाचे विरोधक संपवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना अडकवणे हे षडयंत्र आहे. असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
गुन्हा दाखल करणाऱ्या रिदा राशिद कोण आहेत?रिदा रशिद या भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. त्या भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेशबॉडीवर पदाधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, सुधिर मुनगूंटीवार हे भाजपाचे नेते यांच्याशी रिदा रशिद यांची जवळीकता आहे. कळवा मुंब्रा येथुन रशिद यांना आव्हाडांच्या विरोधात आमदारकी जिकांयची आहे.
...तर ठाणे महापालिका एकनाथ शिंदे व फडणविसांच्या हातातुन जाणार
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे शिंदे फडणविसांसमोर आव्हान आहेत. जर आव्हाडांना आत्ताच रोखले नाही, तर शिंदे-फडणविसांना सत्तेत असुन ही घरच्या मैदानात पराभवाची नामुष्की मुख्यमंत्र्यावर येऊ शकते. परंतू आव्हाडांवर गुन्हा दाखल केल्याने ठाण्यातुन आव्हाडांना सहानभुती मिळताना दिसुन येत आहे.



Post a Comment