वाशिंबे-प्रतिनिधी (सचिन भोईटे)
ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थान वाशिंबे ता.करमाळा येथे अष्टमीनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, हरिनाम जप व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता झाली. यावेळी भव्य दिपोत्सोव करून रात्री भैरवनाथ जन्मोत्सवाची हरिकिर्तन सेवा, युवक मित्र गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांची झाली. विविध विषयांवर महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची सात दिवस किर्तने झाली. आठव्या दिवशीचे हरी किर्तन ह.भ.प. संदिपान महाराज हासेगांवकर, परिक्षक तथा अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था, आळंदी यांच्या किर्तनसेवेने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी हासेगांवरकर महाराज यांनी आपल्या किर्तन सेवेत अनेक विषयांना स्पर्श करत उपस्थितांना ज्ञानामृत पाजले. जीवन जगत असताना कसं जगावं, प्रपंच आणि परमार्थ कसा करावा? जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे? ते मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? अनेक महापुरूष संताची उदारणे देत सत्य मार्गाने चालण्याचा त्यांनी संदेश दिला. अशा विविध बाबी त्यांनी आपल्या किर्तनातून स्पष्ट केल्या. यानंतर स्व.यशवंत व मल्हारी मारूती पवार, स्व.विठ्ठल पांडुरंग पवार, स्व.दिगांबर मल्हारी पवार, स्व. हरी विठ्ठल पवार यांचे स्मरणार्थ वाशिंबे येथील पवार कुटुंबीयाच्या वतीने ५००० लोकांच्या भोजनव्यवस्थेने महाप्रसाद पंगतीने सप्ताहाची सांगता झाली. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन भैरवनाथ मंदिर ट्रस्ट समिती, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ यांनी केले. यावेळी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



Post a Comment