करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)
करमाळा तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचीच शासकीय कमिट्यांवर नियुक्ती झाली असुन, काँग्रेस पक्षाचे नुतन तालुका अध्यक्षाचा आरोप बिनबुडाचा व अर्धवट सत्य असुन, तालुका अध्यक्ष होण्यापुर्वी ते कोणत्या पक्षात होते? याचा त्यांनी विचार करावा. असा टोला काँग्रेस पक्षाचे ओ. बी. सी. सेलचे माजी शहराध्यक्ष चंद्रकात मुसळे यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांना पाठविलेल्या ईमेल मध्ये म्हटले आहे की, तत्कालीन जिल्हा काँग्रेस (आय) कमिटीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या आदेशानुसार, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष देवानंद गुंड पाटील, काॅग्रेस पक्षाचे पक्षनिरीक्षक अशोक चोपडे या दोन पदाधिकाऱ्यांनी शासकीय कमिटीवर कार्यकर्तेची नावे घेण्याकामी करमाळा दौरा केला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत यांनी त्यांच्या लेटरपॅडवर काॅग्रेस (आय) पक्षाचे निष्ठावंत 20 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावांची यादी दिली होती. सदर दोन्ही निरीक्षकांनी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाअध्यक्ष यांच्या मार्फत आमदार संजयमामा शिंदे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांच्याकडे वीस नावाची यादी सुपूर्द करण्यात आली होती. त्यामध्ये सोळा कार्यकर्त्यांची शासकीय कमिटीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी काॅग्रेस पक्षाला शासकीय कमिटीवर घेण्यात आले नाही. असा बिनबुडाचा आरोप केला आहे. हे अर्धवट सत्य आहे. नुतन तालुका अध्यक्ष हे त्यावेळी कोणत्या पक्षात होते? हे त्यांनी स्वत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. असे करमाळा शहर काँग्रेस (आय) ओ. बी. सी. सेलचे माजी शहराध्यक्ष चंद्रकात मुसळे यांनी पाठविलेल्या ईमेल मध्ये आहे.
यावेळी अधिक माहिती देताना मुसळे म्हणाले की, नुतन तालुका अध्यक्षांनी वर्तमान पत्रात आरोप केला आहे की, ज्या पदाधिकाऱ्यांना शासकीय कमिटीवर घेण्यात आले. ते आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक आहेत. हा आरोप बिनबुडाचा व अर्धवट सत्य आहे. उलट त्यांनी ज्या नवीन व त्यांचे समर्थक असणारे काँग्रेस कार्यकर्त्यांची शासकीय कमिटीवर नियुक्तीसाठी जी यादी दिली. त्याचा आमदार व पालकमंत्र्यांनी विचार करावा!!! असे कुठेही दिसुन येत नाही. उलट जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आमदार, पालकमंत्री व माजी जिल्हाअध्यक्ष यांनी न्याय देण्याचे काम केले असल्याचे, मुसळे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांना पाठविलेल्या ईमेल मध्ये म्हटले आहे.




Post a Comment