संजयमामा शिंदे बिनकामाचे व निष्क्रिय असुन, टाईमपास म्हणुन निवडणुकीत उतरले असल्याचा घणाघाती प्रहार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता प्रचारास वेग आला असून, एकमेकांच्या विरोधात टिका टिपणी जोरदार पणे चालू आहे. यावरुनच आज पाटील गटाकडुन थेट माजी आमदार संजयमामा शिंदे यांना लक्ष केले गेले. यावेळी बोलताना तळेकर म्हणाले की, माजी आमदार संजयमामा शिंदे हे आमदार पदावरुन काम करण्यास लायक नसल्याने जनतेने त्यांना घरी बसवले आहे. त्यांनी जनतेची केलेली फसवणुक व त्यांची निष्क्रियता यावर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे. या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील यांना ९६ हजार मते मिळाली. विशेष म्हणजे करमाळा तालूक्यासह माढा तालुक्यातील छत्तीस गावांनी ही आबांना भरगोस मतदान केले. यामुळे आता संजयमामा शिंदे यांनी आत्मचिंतन करावे.
करमाळा तालुक्यातील जनते पाठोपाठ करमाळा तालुक्यातील नेते मंडळीनी सुद्धा संजयमामा शिंदे यांना चांगलेच ओळखले आहे. ज्या माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या कृपा दृष्टीमुळे संजयमामा २०१९ मध्ये आमदार झाले होते. त्याच जयवंतराव जगताप यांनी २०२४ मध्ये त्यांना पाडले. व नारायण पाटील यांना आमदार केले. बागल गटास ही पोखरणाऱ्या संजयमामा शिंदे यांना बागल समर्थक या निवडणुकीत जागा दाखवल्या शिवाय राहणार नाहीत. संजयमामा शिंदे यांनी स्वतः ला सोलापूर जिल्ह्याचे नेते म्हणुन काही काळ मिरवले. पण मोहिते-पाटील यांनी एकाच गोळीत दोन शिकारी केल्या व दोन्ही शिंदे बंधुना घरी बसवले. यामुळे उगीच करमाळा तालुक्यातील राजकारणात ढवळाढवळ करणे संजयमामा शिंदे यांनी सोडुन द्यावे. करमाळा तालुक्यातील राजकारणास फसवेगीरीचा व्हायरस जनता लागू देणार नाही.
आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत उतरलेल्या आमदार नारायण पाटील यांचेवर भ्रष्टाचाराचा एक ही आरोप नाही. पण संजयमामा शिंदे यांचे वर शेतकऱ्यांना व विविध बँकाना करोडो रुपयास खोटी कर्ज प्रकरण करुन, गंडवल्याचा आणि करोडो रुपयांची मालमत्ता गोळा केल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला. विशेष म्हणजे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेकडे प्रत्यक्षात भेटुन प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुरावे सुध्दा सादर केले होते. हे प्रकरण अजून पुर्णपणे मिटले नाही. आज ही करमाळा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सिबील खराब झाले म्हणुन बँका कर्ज देत नाहीत. यामुळे संजयमामा शिंदे यांनी अगोदर म्हैसगाव येथील कारखाना का विकला? व खोटी कर्ज प्रकरण काय आहेत? याबद्दल स्पष्टीकरण द्यावे असे आवाहन तळेकर यांनी केले.





Post a Comment