करमाळा तालुक्यातील जनता आपल्या पाठिशी खंबीरपणे उभी असून, करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक गावामध्ये, प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकारणात, राजकारणात कार्यरत राहणार असल्याचे मत प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. करमाळा विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यकर्ता विचारविनिमय बैठकीत ते बोलत होते. प्रा. रामदास झोळ सर संपर्क कार्यालय विकासनगर, करमाळा येथे ही बैठक संपन्न झाली.
या बैठकीस शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मंगवडे, ओबीसी तालुका अध्यक्ष गफूर शेख, तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ, दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा सौ. मायाताई झोळ मॅडम, पोलीस मित्र संघटनेचे तालुकाध्यक्ष संभाजी शिंदे, वाशिंबे गावचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, तालुका उपाध्यक्ष सुहास काळे, संजय जगताप सर, श्रीकांत साखरे पाटील, राजेंद्र वीर, भिमराव ननवरे, तुकाराम गवळी तांदुळवाडी, भरत वायकर, प्रणव जाधव यांच्यासह करमाळा माढा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, करमाळा ही आपली जन्मभूमी असून त्याचे ऋण फेडण्यासाठी बारामती, पुणे, इंदापूर या शहराप्रमाणे करमाळा तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असून, संवैधानिक पदांच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज तसेच शिक्षण, आरोग्याच्या समस्या सोडवता येत असल्याने, विधानसभेची निवडणूक आपण लढवली आहे. जरी आपला पराभव झाला असला तरी परिवर्तनाच्या या लढाईमध्ये शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, युवक, महिलांचा मिळालेला पाठिंबा नक्कीच मला बळ देणारा असून, जनतेच्या कल्याणासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुका गावागावामध्ये शाखा काढून, कार्यकर्त्यांना त्यामध्ये सहभागी करून समाजकारणातून-राजकारण करण्याचा मानस असल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्षीय भाषण करताना शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे म्हणाले की, करमाळा तालुक्यात प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशनच्या शाखा काढुन, गावागावात कार्यकर्त्यांचे संघटन उभा करून त्यांना पाठबळ देऊन, करमाळा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन, करमाळा तालुक्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचे कांबळे यांनी विचार व्यक्त केले. करमाळा तालुक्याच्या येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकीत आपले किमान वीस प्रतिनिधी तरी दिसणार! अशी आशा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता नवीन वर्षामध्ये संकल्प करून गाव तिथे प्रा. रामदास झोळ सर यांचा परिवार मजबूत करण्यासाठी फाउंडेशनच्या शाखा काढण्यासाठी कामाला लागावे. अशा प्रकारे कांबळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
यावेळी प्रास्ताविक श्रीकांत साखरे पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन गोपीनाथ पाटील व आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गणेश मंगवडे यांनी मानले.





Post a Comment