करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील एक छोटसं झरे गाव या गावात 1947 देश स्वातंत्र्य होण्याअगोदर एक महान कुस्ती सम्राट होऊन गेले. त्यांचे नाव पैलवान राजाराम (बापू) जाधव स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्या देशात हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी अशा पदव्या नव्हत्या. परंतु सध्या ज्या प्रकारे एखाद्या खेळाडूला देशासाठी चांगली कामगिरी केली की, पोलीस दलात अथवा सैन्यदलात भरती देऊन सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे त्या वेळच्या शासनाने राजाराम (बापूंची) सैन्यदलात पोस्टिंग करून त्यांचा योग्य तो सन्मान केला होता. आणि त्यांनी देशाची उत्कृष्टरित्या सेवा करत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव शेटीबा जाधव हे सुद्धा एक उत्कृष्ट पैलवान होते. या आठवणीला उजाळा देण्याचे कारण म्हणजे कै.शेटीबा जाधव यांचे १ एप्रिल रोजी असणारे चौथे पुण्यस्मरण.... खरं तर करमाळा तालुक्याची शान असणारे राजाराम (बापू) जाधव हे काळाच्या ओघात, तालुक्यातील नेते मंडळी कडून दुर्लक्षित होत गेले. त्यांचा इतिहास बघितला तर तालुक्याचं नाव त्यांनी संपूर्ण देशभरात गाजवलं होतं. अशा व्यक्तीच्या कुटुंबासाठी तालुक्यातील नेतेमंडळींची सद़्भावना असणे गरजेचे असते. परंतु सध्या ज्या प्रकारची राजकीय व्यवस्था आहे. त्यात अशा व्यक्तीला विसरणे म्हणजे आताच्या राजकीय पुढाऱ्यांसाठी काही अवघड गोष्ट नाही. पण कैलासवासी पैलवान राजाराम(बापू) यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव शेटीबा जाधव यांनी सुद्धा कुस्तीचा वारसा पुढे चालवला. समाजकारणात सुद्धा राजाराम बापूंनी स्वतःचे योगदान दिले. आणि आता बापूंचे नातू सोमनाथ जाधव हे सुद्धा सध्या समाजकारणामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेमध्ये सामील होऊन, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी झटत आहेत.



Post a Comment