Header Ads Widget

 



 करमाळा-प्रतिनिधी 

              करमाळा शहराकडे प्रशासकाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरत असल्याची माहिती नगरसेविका राजश्री माने यांनी दिलेली आहे. रस्ता, गटारी, व पाण्याच्या समस्येने शहरवासी हैराण झाले आहेत. करमाळा नगरपालिकेने कानाड गल्ली येथे 12 ते 13 लाखापर्यंत पाणी पुरवठा योजना केलेली आहे. परंतु जे काम केले ते व्यवस्थित झालेले नाही, ते काम केल्यानंतरही लोकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. याठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.


              तरी संबंधित ठेकेदाराने त्या कामाची दखल घेऊन कुठे अडचण येत आहे त्या अडीअडचणी सोडवाव्यात. शहरात जेव्हापासून प्रशासक आले आहे, तेव्हापासुन ते करमाळा शहरात फिरले देखील नाही. अडीअडचणी तपासून त्यांनी कुठलीच दखल घेतलेली दिसुन येत नाही. सध्या पाणी, गटारी, रस्ता ह्या तिन्ही गोष्टी नागरिकांसाठी मूलभूत गरजा आहेत. तिन्ही गोष्टींकडे दूर्लक्ष होत आहे, त्यांनी सगळ्या अडचणी  सोडवल्या पाहिजेत. प्रशासक अधिकारी या सर्व समस्यांकडे डोळेझाक करीत आहेत. तरी करमाळा शहरामध्ये नेमके काय चालले आहे हेच समजुन येत नाही. तरी याठिकाणी सर्वांनी आपली जबाबदारी समजून व लक्ष घालून, करमाळा शहराच्या समस्या, अडचणी सोडवाव्यात. नाहीतर प्रशासन विरोधात आंदोलन करणार, असा इशारा नगरसेविका राजश्री माने यांनी दिलेला आहे.


Post a Comment